कोकणातील सुधागड, रसाळगड, सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग, तर मुंबईतील ६ गडांचे संवर्धन होणार ! – अमित देशमुख, सांस्कृतिक कार्यमंत्री

सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

मुंबई, ४ मार्च (वार्ता.) – कोकणातील सुधागड, रसाळगड, सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग, तर मुंबईतील सेंट जॉर्ज, शिवडी, वरळी, माहिम, धारावी अन् वांद्रे या गडांचे राज्य पुरातत्व विभागाकडून संवर्धन करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली. भाजपचे आमदार अधिवक्ता निरंजन डावखरे यांसह अन्य आमदारांनी उपस्थित केलेला गडांच्या सवंर्धनाविषयीचा तारांकित प्रश्न ४ मार्च या दिवशी विधान परिषदेत प्रश्नांमध्ये उपस्थित करण्यात आला होता. त्यावर अमित देशमुख यांनी वरील लेखी उत्तर दिले आहे.