
पुणे – राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून चालू करण्याचा निर्णय झाला आहे; मात्र पालकांची आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची मानसिकता दिसत नाही. दिवाळीनंतर पालक मुलांना शाळेत पाठवण्यास सिद्ध आहेत. लहान मुलांच्या लसीविषयी जोपर्यत केंद्राच्या पातळीवर निर्णय होत नाही, तोपर्यंत आपण काही करू शकत नाही. केंद्र सरकारने लहान मुलांच्या लसीकरणाविषयी लवकरात लवकर कळवावे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ते पुण्यामध्ये कोरोना संसर्ग स्थितीचा आढावा घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !
कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !
ससून रुग्णालयातील तज्ञांची चौकशी समिती स्थापन !