
नागपूर – ज्या वेळी अतीवृष्टी होऊन पुष्कळ हानी होते, तेव्हा आणीबाणीच्या आधारावरच साहाय्य करता येते. तेव्हा व्यक्तीगत पंचनाम्याची आवश्यकता भासत नाही. पंचनामे होत रहातील; पण शेतकर्यांना तातडीने साहाय्य करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.
ते पुढे म्हणाले की, अतीवृष्टी झालेल्या ठिकाणी मंत्री आणि प्रमुख लोक गेले, तर प्रशासन जागे होते, लोकांना दिलासा मिळतो. कुणीतरी आपले ऐकत आहे, हे लोकांना समजते. अतीवृष्टी झालेल्या ठिकाणी मीही २ ऑक्टोबरपासून ३ दिवसांच्या दौर्यावर जाणार आहे. वाशिम येथून माझा दौरा चालू होणार आहे. सरकारला पूरपरिस्थितीची माहिती देऊन अधिकाधिक साहाय्य मिळवण्याचा प्रयत्न करू.
सरकारच्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत !
‘राज्यात आतापर्यंत ज्या ज्या आपत्ती आल्या, त्या वेळी सरकारने केलेल्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. कोणत्याच घोषणेची अद्याप पूर्तता झालेली नाही.’, असे फडणवीस यांनी सांगितले.
नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ त्वरित रहित करावा – अधिवक्ता श्री. विश्वास पानसे, प्रमुख विश्वस्त, मार्तंड देवस्थान, जेजुरी
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन