श्रीनगरमध्ये आतंकवाद्यांकडून पोलीस निरीक्षकाची हत्या

‘टीआर्पी’ या जिहादी आतंकवादी संघटनेने घेतले हत्येचे दायित्व !

काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद नष्ट होण्याऐवजी नवनवीन जिहादी आतंकवादी संघटना निर्माण होऊन कारवाया करत आहेत, हे सुरक्षादलांना लज्जास्पद ! सरकारने काश्मीरमधील आतंकवाद नष्ट करण्यासाठी आतंकवाद्यांच्या निर्मात्या पाकला नष्ट करण्यासाठी पाऊल उचलणे आवश्यक !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – येथील कनिपोरा भागात मशिदीत नमाजपठणासाठी जात असतांना पोलीस निरीक्षक परवेझ अहमद दार यांची दोघा जिहादी आतंकवाद्यांनी पाठीमागून गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांना मिळाले असून त्याद्वारे आतंकवाद्यांचा शोध घेतला जात आहे. परवेझ ‘सीआयडी’मध्ये (गुन्हे अन्वेषण विभागामध्ये) कार्यरत होते. परवेझ यांच्या हत्येचे दायित्व जिहादी आतंकवादी संघटना ‘द रेझिस्टंट फ्रंट’ (टीआर्पी) हिने घेतली आहे. यापूर्वी १७ जून या दिवशी आतंकवाद्यांनी श्रीनगरमध्येच एका पोलीस शिपायाची हत्या केली होती. या हत्येचे दायित्वही याच जिहादी संघटनेने घेतले होते.