
‘या नश्वर देहास बाहेरून सजवण्यासाठी निरनिराळे अलंकार घातले, निरनिराळ्या प्रकारची उटणी, साबण यांनी स्वच्छ करून आणि सुवासिक करण्याचा प्रयत्न केला, तरी त्या देहातील आत्म्यास त्याचा काहीही उपयोग नसतो. त्याला सुगंध किंवा दुर्गंध याचेही काही वाटत नसते. जसे ताप आलेल्या मनुष्याने कुपथ्य केल्यास ताप वाढतो, तसा शृंगार हा विषयवासनायुक्त मनुष्यास अधोगतीस नेण्यास पात्र होतोेे. क्षयी मनुष्यास शृंगार चढवल्यास त्याची व्यथा अल्प होईल का ? त्यासाठी औषध आणि पथ्य याचीच आवश्कता असते.’
– प.प. भगवान श्रीधरस्वामी
(संदर्भ : मासिक ‘श्रीधर-संदेश’ जानेवारी १९९८)
भारतियांचे ईश्वरप्राप्तीच्या प्रयत्नांचे अलौकिकत्व !
शाळेत मुलांना हिंदु धर्म न शिकवल्याचे दुष्परिणाम
लक्षात घ्या, विज्ञानाची ही मर्यादा !
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !