साधना करणारे आपत्काळात इतरांना साह्य करू शकतात !

नैसर्गिक आपत्ती किंवा आतंकवादी आक्रमणांच्या वेळी राष्ट्रकर्तव्याची जाण असणारेच भावनाशील न होता तत्परतेने साहाय्य करतात. राष्ट्रकर्तव्याची जाण सर्वांमध्ये निर्माण होण्यासाठी आतापासूनच प्रबोधन आणि जनजागृती करायला हवी. यासह भगवंताची भक्ती आणि साधना केल्यास आपत्काळातून तरून जाता येईल !