
सांगली, ३ मार्च (वार्ता.) – सांगलीतील कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाच्या दुरुस्तीसाठी सध्या वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी, बाजारासाठी येणार्या महिला, नोकरी-व्यवसायासाठी जाणारे युवक आणि नागरिक यांची मोठी ससेहोलपट होत आहे. त्यांना पर्यायी मार्ग म्हणून शहराबाहेरून गेलेल्या पर्यायी पुलावरून यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाया जाऊन त्रासही सोसावा लागत आहे. तरी आयर्विन पुलाजवळील समांतर पुलाचे काम तातडीने चालू करावे, अन्यथा जनआंदोलन छेडू, अशी चेतावणी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष धीरज सूर्यवंशी यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.
या वेळी भाजप संघटक सरचिटणीस दीपक माने, सचिव विश्वजित पाटील, युवा मोर्चा संघटक सरचिटणीस किरण भोसले, उपाध्यक्ष कृष्णा राठोड उपस्थित होते.
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
फुलचंद रोकडे यांच्याकडून योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी वस्त्रदान आणि धोंडे जेवण
पिंपरी-चिंचवड बसस्थानकातील एका बसचे छत उखडले !
कराड येथे जप्त केलेले ‘सायलेन्सर’ आणि ‘प्रेशर हॉर्न’ ‘रोडरोलर’ने चिरडले !
लोकलमध्ये हिंदूला चाकूने भोसकले; मुसलमानासह तिघे कह्यात !
Shivayogi Lohar Suspended : लव्ह जिहादचे प्रकरण दडपणारा पोलीस निरीक्षक निलंबित !