
‘जम्मू-काश्मीर अधिकारिक भाषा विधेयक २०२०’ लोकसभेत संमत करण्यात आले. या विधेयकात हिंदी, इंग्रजी, उर्दू, काश्मिरी, डोगरी या भाषांना अधिकृत भाषांचा दर्जा देण्यात येणार आहे. हे विधेयक गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सादर केले. त्याला नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार हसनैन मसूदी यांनी विरोध केला. त्याला उत्तर देतांना रेड्डी म्हणाले, ‘‘जम्मू काश्मीरमध्ये उर्दू बोलणारे केवळ ०.१६ टक्के लोक आहेत; परंतु गेल्या ७० वर्षांपासून हीच येथील अधिकृत भाषा बनली होती. ‘आम्ही जी भाषा बोलतो, त्या भाषांनाही अधिकृत भाषेचा दर्जा मिळावा’, अशी येथील लोकांची मागणी होती.’’
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
मूल्याधिष्ठित पत्रकारिता देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !