‘शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती’, हे विसरू नका ! – बसनगौडा पाटील, आमदार, विजापूर

मराठा विकास महामंडळाला केलेल्या विरोधाचे प्रकरण

बेळगाव – तुमचा खेळ बेंगळुरू येथे करा. इथे तुमचे काही चालत नाही. ‘शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती’, अशी महती छत्रपती शिवाजी महाराज यांची सांगितली जाते, हे, विसरू नका. विधानसभेत हक्कभंग आणून तुमची खरडपट्टी काढण्यास मला वेळ लागणार नाही, अशी चेतावणी विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी वाटाळ नागराज आणि कन्नड संघटना यांना दिली. मराठा विकास महामंडळामुळे पोटशूळ उठलेल्या वाटाळ, नागराज आणि कन्नड संघटनांनी ५ डिसेंबरला ‘कर्नाटक बंद’ची हाक दिली होती. त्या पार्श्‍वभूमीवर आमदार पाटील यांनी बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते.