ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची चेतावणी !

ए.आय.निर्मित चित्र

ठाणे – जिल्ह्यात मागील २ दिवसांपासून चालू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने ४ जुलैसाठी ‘रेड अलर्ट’ (उच्च धोका), तर ३ आणि ५ जुलैसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ (सावधानतेची चेतावणी) घोषित केला आहे. अतीमुसळधार पाऊस, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, पाणी साचणे, पूरस्थिती आणि वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने जिल्हा प्रशासन अन् स्थानिक स्वराज्य संस्था सतर्क झाल्या आहेत.