
कल्याण – कट मारल्याच्या (मागील वाहनाला अडवून वाहन पुढे नेल्याच्या) कारणावरून झालेल्या वादातून २ – ३ इराणी तरुणांनी रिक्शातून प्रवास करणार्या भावेश पाटील यांना पुष्कळ मारहाण केली. यात ते घायाळ झाले. ही घटना आंबिवली रेल्वेस्थानक परिसरात रात्री १० वाजता घडली. या वेळी भावेश यांच्या पत्नीलाही त्यांनी धक्काबुक्की केली. भावेश यांची सोन्याची साखळीही त्यांनी चोरली. या प्रकरणी भावेश यांनी तक्रार प्रविष्ट केली असून संबंधितांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भावेश यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत; मात्र या घटनेमुळे आंबिवली परिसरातील इराणी टोळीची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे.
आंबिवलीतील इराणी वस्ती ही चोरट्यांची वस्ती म्हणून कुप्रसिद्ध आहे. ‘दहशत माजवणार्या इराणी टोळीविरोधात कठोर कारवाई करावी’, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
‘सार्वजनिक काका पुरस्कार – २०२६’ वितरण सोहळा तूर्तास पुढे ढकलला
राज्यात ‘स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव’ पुरस्कार चालू करणार !
महिलांना ‘शेतकरी’ म्हणून मान्यता; ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’ विधानसभेत एकमताने संमत !
आरोग्य योजनांची प्रभावी कार्यवाही ! – आरोग्यमंत्री
विधीमंडळाच्या अधिवेशनातील कामकाजाविषयी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये बैठकच होत नाही !
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे आयुक्तांसमवेत बैठक घेऊन गुन्हेगारांवर कारवाई करणार ! – गृहराज्यमंत्री