गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेची व्याप्ती वाढवणार ! – एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा, १२ एप्रिल (वार्ता.) – ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’, ही योजना शेतकर्‍यांसह धरण क्षेत्रातील लाभार्थ्यांना पुष्कळ उपयोगी आहे. या योजनेची व्याप्ती राज्यात वाढवणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ‘जिल्हाधिकारी कार्यालय’ आणि ‘नाम फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने कोयना धरणातील गाळ काढण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. याचा शुभारंभ महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपवन संरक्षक अमोल सातपुते यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.