साधनाविहीन पोलिसांचे कर्तृत्व !

साधनाविहीन पोलिसांचे कर्तृत्व !

‘श्रीरामाला रावणाने श्रीलंकेत नेलेल्या सीतेला शोधता आले; पण पोलिसांना एखाद्या गावातील साध्या चोरांना पकडता येत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मुलांना लहानपणापासून साधना न शिकवल्यामुळे देश सर्वच क्षेत्रांत रसातळाला गेला आहे !

मुलांना लहानपणापासून साधना न शिकवल्यामुळे देश सर्वच क्षेत्रांत रसातळाला गेला आहे !

. . . गुन्हे होण्याच्या कारणांच्या मुळाशी जाऊन उपाय केले पाहिजेत, म्हणजे साधना शिकवली पाहिजे. हल्ली हे कुणालाच कळत नाही. त्यामुळे देश पराकोटीच्या रसातळाला गेला आहे. यावर उपाय एकच आणि तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना करून सर्वांना साधना शिकवणे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

यात आश्चर्य ते काय !

यात आश्चर्य ते काय !

‘काँग्रेस’ हे इंग्रजी नाव असलेला पक्ष स्वातंत्र्यापासून आतापर्यंत देशाचे भले करू शकला नाही, यात आश्चर्य ते काय !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राचा झेंडा हा भगवाच असेल !

हिंदु राष्ट्राचा झेंडा हा भगवाच असेल !

‘हिंदु राष्ट्राचा झेंडा सत्त्व-रजप्रधान भगवा असेल. तो काही युगांपासून भारताचा झेंडा आहे. अर्जुन, छत्रपती शिवाजी महाराज इत्यादींचा तोच झेंडा होता.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

स्त्रीरक्षणाच्‍या दृष्टीने ‘हिंदु’ उपाय !

स्त्रीरक्षणाच्‍या दृष्टीने ‘हिंदु’ उपाय !

‘मुसलमानांत मुलींच्या रक्षणासाठी बुरखा घालायची पद्धत आहे, तर हिंदूंना पूर्वी परस्त्रीकडे ‘आई’ म्हणून पहाण्याचा दृष्टीकोन दिला जायचा. त्यामुळे मुलींवर अत्याचार व्हायचे नाहीत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवादी आणि सर्वधर्मसमभाववाले यांची मर्यादा !

बुद्धीप्रामाण्यवादी आणि सर्वधर्मसमभाववाले यांची मर्यादा !

‘संशोधनासाठी वापरण्यात येणार्‍या उपकरणांना हिंदु धर्माची श्रेष्ठता कळते, तर बुद्धीप्रामाण्यवादी आणि सर्वधर्मसमभाववाले यांना कळत नाही, हे लक्षात ठेवा.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

तक्रार नको, तर अंतर्मुख होऊन कारण शोधा !

तक्रार नको, तर अंतर्मुख होऊन कारण शोधा !

‘अनेक जण ‘त्‍याची प्रगती होते; पण माझी प्रगती होत नाही’, अशी तक्रार करतात. खरे तर येथे ‘माझ्‍यामध्‍ये काय कमी आहे की, ज्‍यामुळे माझी प्रगती होत नाही ?’, याचा विचार करणे आवश्‍यक असते.’ – सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१.५.२०२३)

हिंदूंची स्थिती अत्यंत केविलवाणी होण्यामागील कारण !

हिंदूंची स्थिती अत्यंत केविलवाणी होण्यामागील कारण !

हिंदूंना धर्माविषयी प्रेम आणि अभिमान, तसेच धर्मासाठी लढायला कधीच शिकवले जात नाही. त्यातच बुद्धीप्रामाण्यवादी धर्माविरुद्धचे विचार हिंदूंवर बिंबवतात. यांमुळे हिंदूंची स्थिती जगातच नाही, तर भारतातही अत्यंत केविलवाणी झाली आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

म्हणे बुद्धीप्रामाण्यवादी !

म्हणे बुद्धीप्रामाण्यवादी !

‘एखाद्या विषयावर अभ्यास नसतांना त्यावर बडबडणारे म्हणजे बुद्धीप्रामाण्यवादी !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

व्यक्ती-स्वातंत्र्यवाल्यांचे अज्ञान !

व्यक्ती-स्वातंत्र्यवाल्यांचे अज्ञान !

‘व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली आपल्या मनाप्रमाणे वागणारे वैद्यकीय, न्यायालयीन इत्यादी एकाही क्षेत्रात आपल्या मनाप्रमाणे वागत नाहीत. केवळ आध्यात्मिक परंपरांसंदर्भात मनाप्रमाणे वागतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले