वर्षारंभी सत्त्वगुणी समाजबांधवांचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करा !

‘सध्या समाज, राष्ट्र आणि विश्‍व यांच्यावर कोरोना साथीचे संकट ओढवले आहे. काही काळापूर्वी देशभर पेटलेल्या दंगली, धार्मिक विद्वेष आणि देशविरोधकांचे ऐक्य, तसेच आता उद्भवलेली विषाणूची साथ या स्थुलातून दिसणार्‍या घटना भावी भीषण संघर्षाचे आव्हान सांगणार्‍या आहेत.

‘सेवेच्या माध्यमातून साधकांना गुरुकृपा अनुभवता यावी’, यासाठी सतत प्रयत्नरत असणारे आणि साधकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणारे सद्गुरु सत्यवान कदम !

‘साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली व्हावी, सर्व साधकांची जलद गतीने आध्यात्मिक उन्नती व्हावी अन् सेवेच्या माध्यमातून सर्वांना गुरुकृपा अनुभवता यावी’, यासाठी सद्गुरु सत्यवानदादा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील साधकांचा सत्संग घेतात.

यवतमाळ येथे विलगीकरण कक्षात ६ जण भरती

स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात भरती असलेल्या नागरिकांची संख्या ६ झाली आहे. त्यांपैकी ३ जण कोरोनाबाधित असून उर्वरित ३ जण निगराणीखाली आहेत.

‘होम क्वारंटाइन’ सांगितलेल्यांवर पोलिसांचे ‘व्हॉट्सअ‍ॅप ‘व्हिडिओ कॉल’द्वारे लक्ष

‘होम क्वारंटाइन’ सांगितलेले लोकही घराबाहेर पडून अन्यत्र फिरत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. कल्याण-डोंबिवली पोलीस ‘व्हॉट्सअ‍ॅप ‘व्हिडिओ कॉल’द्वारे त्यांच्यावर लक्ष ठेवत आहेत.

कोरोना साथीमुळे नांदापूर (जिल्हा हिंगोली) गावात नवीन व्यक्तींना प्रवेशबंदी

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर शहरी भागासमवेतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या जात असून जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील नांदापूर येथील गावकर्‍यांनी नवीन व्यक्तींना गावात प्रवेशबंदी केली आहे.

कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी सामाजिक योगदान द्यावे ! – शेखर सिंह, जिल्हाधिकारी

कोरोना विषाणूचा संसर्ग हे जागतिक संकट असून त्याचा संसर्ग थांबवणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येक आस्थापन आणि कारखाने यांनी कामगारांना घरी थांबण्याच्या सूचना द्याव्यात.

ठाणे जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांकडून घरपोच पोषण आहाराचे वाटप

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये; म्हणून शाळा-महाविद्यालयांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या सध्या बंद आहेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संबंधित गावांमध्ये घरोघरी जाऊन सेवा देत आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात अवैध मद्यविक्री करणार्‍या १४७ जणांवर गुन्हा नोंद

२१ आणि २२ मार्च या काळात अवैध मद्यविक्री करणार्‍या १४७ जणांवर अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. वरील दोन्ही दिवशी ९ लाख ४८ सहस्र ३७४ रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे.