देव आणि मानव यांच्यातील भेद !

देव आणि मानव यांच्यातील भेद !

‘देव जमीन, पाणी, हवा इत्यादी सर्व फुकट देतो. मानव मात्र प्रत्येक गोष्ट विकत देतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

स्वराज्य हे सुराज्य नसते !

स्वराज्य हे सुराज्य नसते !

‘स्वराज्य हे सुराज्य नसते. याचे कारण हे की, रज-तमप्रधान लोकांचे स्वराज्य कधी सुराज्य नसते. भारताने हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची ७४ वर्षे अनुभवले आहे.’

हिंदूंनो, स्वरक्षणासाठी साधना करा !

हिंदूंनो, स्वरक्षणासाठी साधना करा !

‘शारीरिक आणि मानसिक बळांपेक्षा आध्यात्मिक बळ श्रेष्ठ असूनही हिंदू साधना विसरल्यामुळे चिमूटभर धर्मांध आणि इंग्रज यांनी काही वर्षांतच संपूर्ण भारतावर राज्य केले ! आता तसे पुन्हा होऊ नये; म्हणून हिंदूंनी साधना करणे अतिशय आवश्यक आहे.’

महायुद्धापासून रक्षण होण्यासाठी साधना आवश्यक !

महायुद्धापासून रक्षण होण्यासाठी साधना आवश्यक !

‘एखादा रोग होऊ नये; म्हणून लसीकरण म्हणजेच ‘व्हॅक्सिनेशन’ करतो, तसेच तिसऱ्या महायुद्धाच्या काळात वाचण्यासाठी साधना हीच लस आहे.’

प्रत्येक पिढीचे कर्तव्य !

प्रत्येक पिढीचे कर्तव्य !

‘प्रत्येक पिढी पुढील पिढीकडे समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात अपेक्षेने पहाते. याऐवजी प्रत्येक पिढीने ‘आम्हाला काय करता येईल ?’, असा विचार करून असे कार्य केले पाहिजे की, पुढच्या पिढीला त्यांसंदर्भात काही करण्याची आवश्यकता न उरल्याने ती सर्व वेळ साधनेला देऊ शकेल !’

परात्पर गुरु डॉक्टरांचे अध्यात्मविषयक मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉक्टरांचे अध्यात्मविषयक मार्गदर्शन

‘एखाद्याने एखादी वस्तू दिली, तर घेणाऱ्याला आनंद होतो. यापुढे गेल्यावर वस्तू देणाराच मिळाला, तर त्याला किती आनंद होईल ! ईश्वरच सर्व गोष्टी देणारा असल्याने त्याच्या प्राप्तीने सर्वाेच्च आनंद होतो !’

जगात एकमेव धर्म आहे हिंदु धर्म !

जगात एकमेव धर्म आहे हिंदु धर्म !

सनातन हिंदु धर्माला उत्पत्ती नसल्यामुळे, म्हणजे तो अनादि असल्यामुळे तो अनंत काळपर्यंत रहाणार आहे. हे हिंदु धर्माचे वैशिष्ट्य आहे. जगात दुसरा धर्मच नसल्यामुळे ‘सर्वधर्मसमभाव’ हा शब्द किती अयोग्य आहे, हेही यावरून लक्षात येते.’

सर्वधर्मसमभाव म्हणणे ही अज्ञानाची परिसीमा !

सर्वधर्मसमभाव म्हणणे ही अज्ञानाची परिसीमा !

‘जगात केवळ सर्व धर्मांचा अभ्यास न केलेले हिंदू ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणतात. बाकी एकाही धर्मातील एकही जण तसे म्हणत नाही. हिंदूंच्या हे लक्षात येत नाही की, ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणे ही अज्ञानाची परिसीमा आहे, ‘प्रकाश आणि अंधार समान आहेत’, असे म्हणणे आहे !’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘राजकीय क्षेत्रातील सर्वच कार्यकर्त्यांचे विषय मायेतील असल्यामुळे त्यांचे लिखाण अधिक काळ टिकत नाही. याउलट आध्यात्मिक क्षेत्रातील लिखाण बराच काळ किंवा युगानुयुगेही टिकते, उदा. वेद, उपनिषदे, पुराणे इत्यादी.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हुशार कोण ?

हुशार कोण ?

‘पैसे मिळवण्यासाठी भारतीय अमेरिकेत जातात, तर ईश्‍वरप्राप्तीसाठी जगभराचे भारतात येतात ! यांतून हुशार कोण, हे तुम्हीच ठरवा !’