उमेश कोल्हे हत्या प्रकरणात विदेशी शक्ती आहे का ? याची चौकशी होणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करण्यापर्यंत जाणारी धर्मांधांची मजल मोडून काढण्यासाठी नवे सरकार पावले उचलेल, ही अपेक्षा !

सभागृहात विलंबाने पोचल्याने काँग्रेसच्या ५ आमदारांना मतदानापासून मुकावे लागले !

बहुमत चाचणीला वेळेवर उपस्थित न राहिल्याने त्यांना मतदान करता आले नाही. वेळेचे गांभीर्य नसलेले असे लोकप्रतिनिधी जनतेची कामे वेळेवर करत असतील का ?

शिवसेनेसमवेत बंडखोरी करणारे कधीही निवडून आले नाहीत ! – अजित पवार, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे.

रिक्शा आणि टॅक्सी चालकांच्या तक्रारी करण्यासाठीची ‘अ‍ॅप’ सुविधा २ वर्षांपासून बंद !

सर्व यंत्रणा हाताशी असतांनाही तांत्रिक त्रुटीमुळे ‘ॲप’ २ वर्षे बंद असणे, हे प्रशासनाला लज्जास्पद नव्हे का ?

महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल इंधनांवरील कर अल्प करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल इंधनांवरील कर अल्प केला, तशाच प्रकारचा निर्णय आता महाराष्ट्रात घेतला जाईल. पेट्रोल आणि डिझेल या इंधनांवरील कर लवकरच अल्प करण्यात येणार आहे

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन !

पंढरपूर आषाढी वारी सोहळ्यासाठी आळंदी येथून निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे ४ जुलै या दिवशी सोलापूर जिल्ह्यात कारुंडे येथे आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी माऊलींच्या पादुकांचे पूजन करून पालखीचे स्वागत केले.

मुख्यमंत्र्यांचे ठाणे नगरीत जोरदार स्वागत !

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे ४ जुलै या दिवशी प्रथमच ठाणे येथे आले. ठाणे येथील समर्थकांनी त्यांचे स्वागत केले. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच ठाणे जिल्ह्याला ‘मुख्यमंत्रीपद’ मिळाल्याने ठाणेकरांनी आनंद व्यक्त केला.

आम्ही दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जिवंत ठेवू ! – गुलाबराव पाटील, आमदार

शिवसेना रसातळाला जात असतांना तिला वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला. शिवसेना संपत असेल, तर ती वाचवण्याचे दायित्व आमचे आहे. असे प्रतिपादन एकनाथ शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना उत्तर देतांना केले.

सूरत-चेन्नई महामार्गाची मोजणी ११ जुलैपर्यंत पूर्ण होणार !

सूरत-चेन्नई महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातून हा महामार्ग जाणार आहे. ५ जून २०२२ पासून भूमी मोजणीचे काम चालू करण्यात आले होते. हे काम समुहाने गतीने केल्याने अंतिम टप्प्यात असून ११ जुलैपर्यंत पूर्ण..

आणखी एकही झाड न तोडता एक वर्षात आरे येथे कारशेडचे काम पूर्ण करू ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

आरे कॉलनीमध्ये मेट्रोच्या कारशेडचे २५ टक्के काम झाले आहे. आम्ही लोकांचा पैसा वाया जाऊ देणार नाही. विलंबामुळे या कामाचा व्यय १०-१५ सहस्र कोटी रुपयांपर्यंत वाढणार आहे. एका वर्षात एकही झाड न तोडता आरे येथे कारशेडचे काम पूर्ण करू