आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचे सखोल ज्ञान व्हावे, यासाठी तळमळीने प्रयत्न करणारे नगर जिल्ह्यातील काही ज्येष्ठ वैद्य

आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचे सखोल ज्ञान व्हावे, यासाठी तळमळीने प्रयत्न करणाऱ्या नगर जिल्ह्यातील काही ज्येष्ठ वैद्यांबद्दल या लेखातून जाऊन घेऊयात.

आयुर्वेदाचा लौकिक वाढवणारी जागतिक आयुर्वेद परिषद

विज्ञान भारती, आयुष मंत्रालय आणि गोवा शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पणजी येथे कला अकादमी परिसरात नववी जागतिक आयुर्वेद परिषद चालू आहे. ८ ते ११ डिसेंबर २०२२ या कालावधीत होत असलेल्या या परिषदेमुळे जागतिक स्तरावर आयुर्वेदाचा लौकिक वाढण्यास साहाय्य होणार आहे.

बासुंदी, खीर इत्यादी दुधाच्या पदार्थांसह आंबट आणि खारट पदार्थ टाळावेत !

एका जेवणावळीला अन्य पदार्थांसह बासुंदी आणि सोलकढी हे पदार्थ होते. त्या दिवशी ते पदार्थ एकत्र खाल्लेल्या सर्वांना उलट्या आणि अतीसार झाल्याने रुग्णालयात भरती करावे लागले होते. त्यामुळे जेवतांना दुधाचे पदार्थ असल्यास काळजी घ्यावी.

मधुमेह आणि पथ्ये !

मधुमेह पीडित ६० ते ७० टक्के लोकांना मधुमेहाच्या गंभीर उपद्रवांची कल्पनाच नसते. त्यामुळे साखरेचे अहवाल आणि औषधे यांवर विसंबून वेगळी दक्षता घेतली जात नाही. किंबहुना काय दक्षता घ्यायची, तेच ठाऊक नसते. याची माहिती करून देण्यासाठी हा लेखप्रपंच !

गोवरसारख्या साथीच्या विकारांचा प्रतिबंध होण्यास साहाय्यक आयुर्वेदाचे उपचार

सकाळी आणि सायंकाळी ‘सनातन यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्ण’, ‘सनातन वासा (अडुळसा) चूर्ण’ आणि मध प्रत्येकी चहाचा पाव चमचा प्रमाणात एकत्र मिसळून लहान मुलांना द्यावे. ३ वर्षांपेक्षा लहान मुलांना हे औषध अर्ध्या प्रमाणात द्यावे.

स्वास्थ्यकर आहाराचे २१ मंत्र अवलंबा आणि निरोगी रहा !

आयुर्वेदाचे नियम आयुर्वेदाच्याच परिभाषेत जाणून घ्यायला हवेत. ते शाश्वत आणि एतद्देशीय (मूळचे) असल्याने अत्यंत उपयुक्त आहेत, हे काळाच्या कसोटीवर सिद्ध झाले आहे.

गोवर आला असल्यास पाळायचे पथ्य

गोवराचा पुरळ अंगावर दिसू लागल्यास मुलाला शाळेत न पाठवता घरीच ठेवावे. शक्यतो त्याला इतरांच्या संपर्कात येऊ देऊ नये. दूध आणि दुधाचे पदार्थ टाळावेत. अल्पाहारासाठी शिरा, उपमा, घावन किंवा भाकरी, तर जेवणामध्ये वरणभात आणि तिखट अन् तेलकट नसलेली भाजी असावी.

उन्हापासूनचे अपाय टाळण्यासाठी सकाळचे कोवळे ऊन अंगावर घ्यावे !

सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत अंगावर ऊन घेतल्यास अधिक प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्व बनते’. परंतु या काळात तीव्र उन्हामुळे पित्त वाढून अपाय होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे उन्हापासूनचे अपाय टाळण्यासाठी सकाळचे कोवळे ऊन अंगावर घ्यावे.’

शरिरात ‘ड’ जीवनसत्त्व निर्माण होण्यासाठी उन्हाचा त्वचेशी थेट संपर्क आवश्यक !

‘काचेतून येणार्‍या सूर्यकिरणांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाच्या निर्मितीसाठी आवश्यक असे अतीनील किरण गाळले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाचा त्वचेशी थेट संपर्क येईल, असे पहावे.’

कोणत्या प्रकारच्या पोटदुखीमध्ये पाणी पिऊ नये ?

‘तीव्र पोटदुखी आणि एकापेक्षा अधिक उलट्या झाल्या असतील, तर पोटाचा गंभीर विकार असू शकतो, अशा रुग्णांनी तोंडाने पाणीसुद्धा घेणे धोक्याचे असते. त्यामुळे असा प्रसंग ओढवल्यास घरगुती उपचार न करता तातडीने आधुनिक वैद्यांना दाखवावे.’