मंत्रीपदाच्या मुक्ततेच्या चर्चेसाठी देवेंद्र फडणवीस देहलीला रवाना !

देवेंद्र फडणवीस

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना बळकट करण्यासाठी सरकारमधून मुक्त करण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याची वाच्यता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली होती. याविषयी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून याविषयी प्रत्यक्ष चर्चा करण्यासाठी अमित शहा यांनी फडणवीस यांना देहली येथे बोलावले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

६ जून या दिवशी दुपारी देवेंद्र फडणवीस देहली येथे रवाना झाले आहेत. सरकारमधून मुक्त करण्याविषयी वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये रहावे, अशी मागणी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून केली जात आहे.