Rahul Gandhi : राहुल गांधी आता काढणार मणीपूर ते मुंबई पदयात्रा

६ सहस्र २०० किलोमीटरचा प्रवास करणार !

नवी देहली – काँग्रेसचे नेते राहुल गांधी आता मणीपूर ते मुंबई अशी पदयात्रा काढणार आहेत. याला ‘भारत न्याय यात्रा’ असे नाव देण्यात आले आहे. राहुल गांधी यांनी यापूर्वी कन्याकुमारी ते काश्मीर अशी ‘भारत जोडो यात्रा’ काढली होती.

भारत न्याय यात्रेत १४ राज्यांमधील ८५ जिल्ह्यांचा समावेश केला जाणार आहे. मणीपूर, नागालँड, आसाम, मेघालय, बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र असा ६ सहस्र २०० किलोमीटरचा प्रवास असणार आहे. भारत जोडो यात्रेने ४ सहस्र ५०० किलोमीटर प्रवास केला होता. या यात्रेत अधिकाधिक लोकांनी सहभाग घ्यावा, याकरता बसची सुविधा करण्यात आली आहे. तसेच पदयात्राही होणार आहे.