नागपूर – मराठा समाजाच्या हक्काचे राज्यघटनेच्या चौकटीत आणि न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारे आरक्षण देण्यात येईल. मराठा आंदोलकांशी समन्वयाचे प्रयत्न चालू आहेत. जटील आणि गुंतागुंतीचे प्रश्न, विशेषत: राज्यघटना आणि न्यायपालिकेचा सहभाग असलेले प्रश्न घाईघाईने सोडवता येत नाहीत. यामध्ये शेवटी विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो. घाईघाईत घेतलेला निर्णय उद्या न्यायालयात टिकला नाही, तर ‘पुन्हा समाजाला मूर्ख बनवण्यासाठी निर्णय घेतला आहे’, अशी टीका होईल. यासाठीच मुख्यमंत्र्यांनी ‘टिकणारा निर्णय घेऊ’, असे स्पष्टपणे सांगितले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलतांना केले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या ४० दिवसांची मुदत २४ ऑक्टोबर या दिवशी संपली आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देऊ ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देऊ ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
नूतन लेख
- श्रीक्षेत्र आळंदी येथे महाराष्ट्रातील गोरक्षक आणि गोशाळाचालक यांच्या वतीने ‘देशी गोवंश बचाव जनआंदोलन’ !
- ज्येष्ठ नागरिकांसाठी आता लोकलगाडीत वेगळ्या डब्याची सुविधा !
- अपेक्षित सुरक्षेच्या अभावी गोवा शासनाच्या ७० टक्के संकेतस्थळांना सायबर आक्रमणाचा धोका
- सासोली येथे ग्रामस्थांच्या सामाईक भूमीत बेसुमार वृक्षतोड
- भरत गोगावले यांना राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता !
- ‘स्वच्छता ही सेवा-२०२४’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, पर्यटन स्थळे ‘शून्य कचरा’ करण्याचा निर्धार !