हिंदूंच्‍या समस्‍यांच्‍या निराकरणासाठी हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करणे आवश्‍यक ! – विश्‍वनाथ कुलकर्णी, हिंदु जनजागृती समिती

वाराणसी (उत्तरप्रदेश) – हिंदूबहुल देशातील हिंदूंची अवस्‍था दयनीय झाली आहे. त्‍यांच्‍या  अनेक समस्‍या असून त्‍यावर हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करणे, हा एकच उपाय आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्‍य समन्‍वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी यांनी केले. चांदपूरगाव येथे आयोजित केलेल्‍या कार्यक्रमात ते बोलत होते. श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी यांनी केलेले मार्गदर्शन ऐकून गावातील माजी प्रमुख आणि अन्‍य ग्रामस्‍थ यांनी ‘हा विषय इतर गावातही सांगूया’, अशी इच्‍छा व्‍यक्‍त केली.

श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी म्‍हणाले, ‘‘आज हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्‍याने त्‍यांच्‍या समस्‍या पुष्‍कळ वाढल्‍या आहेत. एकीकडे ‘लव्‍ह जिहाद’च्‍या माध्‍यमातून हिंदु भगिनींना फसवले जात आहे, तर दुसरीकडे ‘हलाल सर्टिफिकेट’च्‍या माध्‍यमातून समांतर अर्थव्‍यवस्‍था निर्माण करून भारताची अर्थव्‍यवस्‍था अस्‍थिर करण्‍याचे काम सातत्‍याने चालू आहे. त्‍यामुळे आज संपूर्ण हिंदु समाजाने जागे होण्‍याची आवश्‍यकता आहे.’’