राष्ट्राप्रतीच्या सर्वाेच्च त्यागभावनेतून स्फुरलेली काव्यनिर्मिती !

स्वातंत्र्यवीर सावरकर

‘आपल्या मोठ्या भावाला, म्हणजे बाबारावांना जन्मठेपेची शिक्षा झाली आणि धाकट्या भावाला म्हणजे बाळ तथा नारायणाला एका बाँबस्फोट प्रकरणात अटक झाली, हे त्यांना कळले तेव्हा पुढील उद्गार काढणारे सावरकर धन्य होत !

‘अशीच सर्व फुले खुडावी । श्रीरामचरणी अर्पण व्हावी ।
काही सार्थकता घडावी । या नश्वर देहाची ।।’


बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वडील बंधू)

वडील बंधूंना अटक झाल्यावर त्यांच्या धैर्यशाली आणि वीरपत्नी मातृसमान येसूवहिनीला लिहिलेल्या मृत्यूपत्रातील काही ओळी –

‘अमर होय ती वंशलता ।
निर्वंश जिचा देशाकरिता ।।’

‘हे काय बंधु असतो जरि सात आम्ही ।
त्वत्स्थंडिलीच दिधले असते बळी मी ।।’

दीप्तानलात निजमातृविमोचनार्थ ।
हा स्वार्थ जाळूनि आम्ही ठरलो कृतार्थ ।।’

– वीर सावरकर (माझे मृत्युपत्र)

‘माझे मृत्यूपत्र’ मधील ‘निर्वंश होऊनी ठरेल अखंड वंश’ या शब्दरचनेतून सावरकरांचे द्रष्टेपण प्रकट होते.