सामाजिक सलोखा धोक्यात आणणार्यांवर कडक कारवाई करू ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – कुणीही कायदा हातात घेऊ नका. सामाजिक माध्यमांवर कोणतीही पोस्ट लिहितांना काळजीपूर्वक आणि भान ठेवून पाठवा. पोस्ट पाठवतांना सामाजिक तणाव निर्माण होणार नाही आणि कुणाच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घ्या. कायदा हातात घेणार्यांवर, तसेच सामाजिक सलोखा धोक्यात आणणार्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अकोला आणि शेवगाव येथील दंगलींच्या पार्श्वभूमीवर दिली.