सुरक्षेच्या कारणावरून लावलेल्या सीसीटीव्हीद्वारे शेजार्‍यांची हेरगिरी करता येणार नाही ! – केरळ उच्च न्यायालय

थिरूवनंतपूरम् (केरळ) – सुरक्षेचे कारण सांगून सीसीटीव्ही लावून शेजार्‍यांची माहिती घेण्याची, तसेच हेरगिरी करण्याची अनुमती देता येणार नाही, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायालयाने या संदर्भात केरळच्या पोलीस महासंचालकांना सरकारशी चर्चा करून योग्य दिशा-निर्देश ठरवण्याचा आदेश दिला. यावर पुढील मासामध्ये सुनावणी होणार आहे.