खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांना जलपूजनाचे निमंत्रण

सातारा, ११ एप्रिल (वार्ता.) – जिहे-कठापूर योजनेचा प्रधानमंत्री किसान सिंचन योजनेमध्ये समावेश करून योजनेसाठी केंद्र सरकारने २४७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या पालखी मार्गांचे काम मार्गी लावल्याविषयी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आभार मानले आहेत. तसेच जिहे-कठापूरच्या योजनेच्या जलपूजनासाठी निमंत्रणही दिले आहे.
आमदार गोरे आणि खासदार निंबाळकर यांनी १ फेब्रुवारी या दिवशी प्रधानमंत्री मोदी यांची भेट घेऊन लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर योजनेच्या रखडलेल्या कामांविषयी सादरीकरण केले होते. ही योजना माण-खटाव तालुक्यांसाठी संजीवनी ठरणार असल्याने उर्वरित कामे त्वरित पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘जिहे-कठापूर योजनेचा समावेश प्रधानमंत्री किसान सिंचन योजनेत करण्यात यावा’, अशी विनंती दोघांनी पंतप्रधानांकडे केली होती. मोदी यांनी याची तात्काळ नोंद घेत जलशक्ती मंत्रालयाला आदेश देऊन केंद्राकडून निधी देण्याच्या सूचना दिल्या. पंतप्रधानांच्या आदेशानंतर त्वरित हालचाली होऊन त्यांचे गुरु लक्ष्मणराव इनामदार यांच्या नावे असलेल्या जिहे-कठापूर योजनेचा समावेश प्रधानमंत्री किसान सिंचन योजनेत करण्यात आला. तसेच २४७ कोटी रुपयांचा निधीही जाहीर करण्यात आला. त्यातील ६ कोटी रुपये वर्गही करण्यात आले.
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !