
नांदेड – एका मंत्र्यांचा जावई गांजा विकतांना आढळून आला; पण मंत्री म्हणतो की, ही हर्बल तंबाखू आहे. मग आमचे भाजपचे नेते सदाभाऊ खोत म्हणाले की, मराठवाड्यातील शेतकर्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. तुमचा मंत्री हर्बल तंबाखू पिकवू शकतो, तर शेतकर्यांनाही हर्बल तंबाखू लावायची अनुमती द्या. असे केल्यावर शेतकर्यांना चांगले दिवस येतील, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर येथे केली. जिल्ह्यातील कुंडलवाडी येथे देगलूर पोटनिवडणुकीसाठी झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !