प्रेमभंगामुळे आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या तरुणाला पोलिसांनी वाचवले !

वसई – प्रेमभंगामुळे आत्महत्या करण्यासाठी टेकडीवर गेलेल्या एका तरुणाला दोन पोलिसांनी त्याला दूरभाषवर बोलण्यात व्यस्त ठेवून २०० पायर्‍या चढून जाऊन वाचवले. त्याचे मुंबईत रहाणार्‍या २७ वर्षीय तरुणाचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते; मात्र दळणवळण बंदीमुळे त्यांच्या विवाहाला विलंब होत होता. त्यातच त्याच्या प्रेयसीने लग्न केले. त्यामुळे त्याने निराश होऊन आत्महत्येचे पाऊल उचलले.