अल्पसंख्यांकांना राष्ट्राच्या मुख्य धारेत सामील व्हायचे नाही, ही वस्तूस्थिती लक्षात घेणे आवश्यक !

‘राष्ट्रीय विकासात अल्पसंख्यांकांना योग्य तो वाटा मिळाला नाही; म्हणून मुख्य धारेत सामील होणे त्यांना शक्य झाले नाही’, अशा आशयाची वक्तव्ये लोकप्रतिनिधी करत असतात. अल्पसंख्यांकांना मुख्य धारेत सामील होता आले नाही, हे खरे नसून ‘त्यांना सामील व्हायचे नाही’, ही वस्तूस्थिती आहे. हे सर्व हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे. मुख्य धारेत सामील न होताही आपल्या दैनंदिन जीवनात विक्षेप आणि घटनात्मक संरक्षण मिळण्यात अडचण येत नाही, अशी अनुकूल परिस्थिती हिंदूंनीच निर्माण करून ठेवलेली आहे. त्यामुळे सर्वसाधारण मनुष्यस्वभाव लक्षात घेता आणि त्यांच्या धर्मग्रंथांच्या शिकवणुकीची भर घालता, अल्पसंख्यांकांना भारताच्या मुख्य धारेत सामील होणे अजिबात आवश्यक वाटत नाही.

(संदर्भ : मासिक ‘धर्मभास्कर’, सप्टेंबर २०००)