खासगी क्षेत्रांना कवडीमोलाने तेल विहिरी आणि खाणी विकल्याने देशाची होत असलेली हानी

टाटा उद्योगसमूहाचे निवृत्त अध्यक्ष रतन टाटा

प्रमुख उद्योगपती आणि टाटा उद्योगसमूहाचे निवृत्त अध्यक्ष रतन टाटा २९ मार्च २०१३ या दिवशी दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, ‘‘भारत सरकार खासगी क्षेत्रातील हितसंबंधांच्या प्रभावाखाली जाऊन भरकटले आहे. आपले ‘बजेट’ तेच ठरवतात. आपल्या तेल विहिरी, खनिजच्या खाणी, रेल्वेच्या जमिनी, बंदरे त्यांना कवडीमोलाने विकल्या. कुठलेही ‘टेंडर’ चढ्या भावाने विशिष्ट भांडवलदारांना मिळते. या सर्वांमुळे कर्ज वाढत आहे आणि रुपयाचे मूल्य न्यून होत आहे.’’

– श्री. शंकर गोविंद ठाकूर (प्रकाश)

(संदर्भ : ‘श्री पूर्णानंद वैभव’, महापुण्यतिथी विशेषांक २०१४)