परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्या मंडपाचे भूमीपूजन

कणकवली – शहरातील भालचंद्र महाराज संस्थानलगतच्या रस्त्यावर कायमस्वरूपी मंडप उभारणीच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थानच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष सुरेश कामत यांनी केले. या वेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, जि.प. सदस्य संजय आंग्रे, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, रूपेश नार्वेकर, विश्‍वस्त मुरलीधर नाईक, दादा नार्वेकर, माधव कदम, व्यवस्थापक विजय केळुस्कर, तालुका प्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, अँड्. प्रवीण पारकर, सतीश नाईक, अँड्. हर्षद गावडे, तहसीलदार आर्.जे. पवार, मंडल अधिकारी संतोष नागावकर, महावितरणचे बाळासाहेब मोहिते आदी उपस्थित होते.