नवी मुंबई – नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी ८ कोटी रुपयांच्या उद्यान घोटाळ्यातील ३ अधिकार्यांना निलंबित करून कंत्राटदारांचे कंत्राट रहित केले आहे. उद्यान अधिकारी चंद्रकांत तायडे, साहाय्यक उद्यान अधिकारी भालचंद्र गवळी आणि उद्यान अधीक्षक प्रकाश गिरी अशी निलंबित करण्यात आलेल्या अधिकार्यांची नावे आहेत.
हिरावती इंटरप्रायजेस आणि एन्.के. शहा इन्फ्रास्ट्रक्चर या दोन कंत्राटदारांना शहरातील चौक अन् उद्यान संवर्धनाचे काम देण्यात आले होते. कंत्राटदाराला १५ मे या दिवशी कार्यादेश दिला असतांनाही १ मेपासून काम केल्याचे देयक दिल्याचे दाखवण्यात आले आहे. कंत्राटदाराने ‘मे ते ऑगस्ट मासामध्ये उद्यान संवर्धनाचे काम केले’, असे दाखवून ८ कोटी रुपयांची देयके पालिकेकडून संमत करून घेतली होती. या प्रकरणी आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यांनी याविषयी चौकशी समिती नेमली होती. चौकशीत तथ्य आढळून आल्याने संबंधित अधिकार्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करून १५ दिवसांत ८ कोटी रुपये भरण्याचे आदेश अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
योग हा गोमंतकियांच्या जीवनाचा भाग व्हायला हवा ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत
युवतीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी एका शिक्षकाला चोपले !
इयत्ता १० वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मुख्याध्यापकच
गोव्यात अवैध खाणकाम : साळगावकर समूह आणि संबंधित आस्थापनांची अनुमाने १ सहस्र २३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
थोडक्यात महत्त्वाचे (दि : २२.०६.२०२६)
विशाल अग्रवालचा जामीन रहित करण्यासाठी पुणे पोलीस न्यायालयात अर्ज देणार !