मुंबई – गेल्या ७ महिन्यांत मडगाव-मुंबई तेजस एक्सप्रेसचा वक्तशीरपणा २० टक्के आणि मुंबई-मडगाव तेजसचा वक्तशीरपणा ४५ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. तेजसमधील ‘इन्फोटेन्मेंट’ (रेल्वेची माहिती देणारी) सुविधा बंद आहे. आसनामागे ‘स्क्रिन’ऐवजी ‘प्लाय’ लावण्यात आले आहेत. कोकण आणि मध्य रेल्वेवर धावणार्या तेजस एक्सप्रेस, एल्.टी.टी.-मडगाव, सी.एस्.एम्.टी.-मंगळुरू या गाड्यांच्या वक्तशीरपणाची १ नोव्हेंबर २०२५ ते १८ मे २०२६ या कालावधीतील सत्यस्थिती माहिती अधिकारांतर्गत मागवण्यात आली होती.
१. मडगाव-मुंबई तेजस एक्सप्रेस १४२ फेर्यांपैकी केवळ २९ वेळा वेळेवर धावली, तर मुंबई-मडगाव एक्सप्रेस १४२ फेर्यांपैकी केवळ ६४ वेळा वेळेवर धावली आहे, तर उर्वरित वेळेत तेजस एक्सप्रेस १ ते ७-८ घंट्यांपर्यंत विलंबाने धावली
२. एल्.टी.टी.-मडगाव आणि मडगाव-एल्.टी.टी. एक्सप्रेसचा किमान वक्तशीरपणा ३० टक्के, तर एल्.टी.टी.-करमाळी आणि करमाळी-एल्.टी.टी.चा वक्तशीरपणा २५ टक्के आहे.
तेजस एक्सप्रेस पूर्वीप्रमाणे करमळीपर्यंत चालवून परत मुंबईला आणावी, लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव वातानुकूलित एक्सप्रेस करमाळी, तर लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एक्सप्रेस थिविम अथवा सावंतवाडी रोड स्थानकापर्यंत चालवावी. मडगाव एक्सप्रेस, वन्दे भारत, जनशताब्दी, तेजस या चारही गाड्या मडगावला एका मागोमाग जातात. यामुळे वरील पालट न झाल्यास एक्सप्रेस गाड्या कधीच वेळेवर धावू शकणार नाहीत, असे मत रेल्वे अभ्यासक श्रेयस पटवर्धन यांनी मांडले.

अश्लीलता पसरवणार्या ‘स्टँडअप कॉमेडी’ कार्यक्रमांना परिनिरीक्षण मंडळाची पूर्वानुमती अनिवार्य करा !
कौटुंबिक भूमी वाटणीच्या वाटपाचे धोरण सरकारकडून निश्चित !
लहान बाळांना गोमांस खाण्याचा सल्ला देणार्यांवर गुन्हा नोंदवा ! – विश्व हिंदु परिषद
केरळ आणि तमिळनाडू यांचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते ‘चैतन्य’ दिनदर्शिकेचे प्रकाशन !
ड्रोन, रोबोट्स, स्वयंचलित वाहने यांसाठी ‘महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली’ घोषित !
ग्रामीण पातळीपर्यंत दर्जेदार इंटरनेटसाठी ‘महानेट डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ स्थापन !