
मुंबई – राज्य परिवहन महामंडळाने स्वच्छता आणि सुविधा सुधारणा या उद्देशांनी तिकिटावर ‘स्वच्छता अधिभार’ लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रवाशांकडून २ रुपये अतिरिक्त घेतले जाणार आहेत. हा निधी थेट स्वच्छतेसाठी वापरला जाईल. त्यासाठी व्यावसायिक कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नव्या योजनेअंतर्गत १ जूनपासून एस्.टी. स्थानकांवरील सर्व शौचालये प्रवाशांसाठी विनामूल्य उपलब्ध केली जाणार आहेत. प्रत्येक बसस्थानकाची ४ घंट्यांनी स्वच्छता करणे बंधनकारक आहे. बससेवा चालू होण्यापूर्वी प्रत्येक बस आतून आणि बाहेरून स्वच्छ असल्याची निश्चिती कंत्राटदारांना करावी लागेल. प्रत्येक प्रमुख स्थानकावर वाचनालय उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. चालक-वाहकांसाठी विश्रांतीगृहे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. १ जून या दिवशी महामंडळाचा वर्धापनदिनही आहे.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !