ईश्‍वरप्राप्तीसाठी आयुष्य द्यायला नको का ?

ईश्‍वरप्राप्तीसाठी आयुष्य द्यायला नको का ?

‘नोकरीत थोडासा पगार मिळावा; म्हणून ७ – ८ घंटे नोकरी करावी लागते, तर सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि सर्व सामर्थ्यवान ईश्‍वराच्या प्राप्तीसाठी आयुष्य द्यायला नको का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले               

देश रसातळाला जाण्यामागील कारण !

‘प्रथम मोगल, नंतर इंग्रज आणि आता राष्ट्रप्रेम नसलेले विविध राजकीय पक्ष यांच्यामुळे देश रसातळाला गेला आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले    

‘साधना’ हीच खरी लस !

‘साधना’ हीच खरी लस !

‘एखादा रोग होऊ नये; म्हणून लसीकरण (व्हॅक्सिनेशन) करतो, तसेच तिसर्‍या महायुद्धाच्या काळात वाचण्यासाठी साधना हीच लस आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले                

सर्व समस्यांवर एकच उत्तर : हिंदु राष्ट्राची स्थापना !

‘सर्व रोगांना एकच औषध किंवा सर्व दाव्यांना एकच कायदा नसतो; पण राष्ट्र आणि धर्म यांच्या सर्व समस्यांना एकच उत्तर आहे अन् ते म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

‘कुठे आजची मुले, तर कुठे वयाच्या ११ व्या वर्षी आत्मज्योतिज्ञान प्राप्त करणारे शंकराचार्य !’

राजकीय नेते आणि भक्त यांच्यातील भेद !

‘राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते कुणीही पैसे किंवा पद दिले, तर दुसर्‍या पक्षात जातात. याउलट भक्त देवाचा पक्ष सोडून, देवाच्या चरणांशी असलेली जागा सोडून दुसरीकडे कुठेही जात नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले    

साम्यवादामुळे झालेली हिंदूंची केविलवाणी अवस्था !

साम्यवादामुळे झालेली हिंदूंची केविलवाणी अवस्था !

‘मुसलमान साम्यवादी होत नाहीत, तर देवाला न मानणारे हिंदू साम्यवादी होतात. त्यामुळे त्यांना देवाचा आशीर्वाद मिळत नाही. साम्यवादी झालेले हिंदू बंगाल आणि केरळ येथे अधिक प्रमाणात असल्याने तेथील हिंदूंची अवस्था केविलवाणी झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

अशांचे नाव इतिहासात कधी नोंदवले जाईल का ?

अशांचे नाव इतिहासात कधी नोंदवले जाईल का ?

‘शरीर, मन आणि बुद्धी यांनी समजेल असे विश्‍वात १ लक्षांश टक्केही नसतांना त्यांनी कळलेल्या गोष्टींचा बाऊ करणार्‍यांचे नाव इतिहासात कधी नोंदवले जाईल का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

शिक्षणात माणुसकी न शिकवल्याचा परिणाम !

‘शाळेपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत कोणत्याही शिक्षणात माणुसकी न शिकवल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात जनतेला लुबाडणारे व्यावसायिक आणि नोकरी करणारे निर्माण झाले आहेत.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

लहानपणीच्या शाळेतील मित्रांची ८० व्या वर्षीही मैत्री असणे

लहानपणीच्या शाळेतील मित्रांची ८० व्या वर्षीही मैत्री असणे

महाविद्यालयातील मित्र, नोकरीतील सहकारी, शेजारी, नातेवाईक इत्यादींशी लहानपणीच्या शाळेतील मित्रांची जवळीक असते, तशी नसते; कारण शाळेतील मित्रांच्या जवळीकीत स्वार्थ नसतो.