प.पू. दास महाराज यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन’ सोहळ्यासाठी स्वच्छतेची सेवा करतांना तिथे आनंद आणि चैतन्य जाणवणे अन् सेवा संपल्यावर तिथे ‘राम’ हा शब्द उमटणे
‘माझे प.पू. दास महाराज यांच्याकडे येणे-जाणे आहे. मी लग्न होऊन सावंतवाडी येथे आले, तेव्हा माझी प.पू. दास महाराज यांच्याशी प्रथम भेट झाली. प्रथम भेटीतच त्यांनी माझ्यावर पुष्कळ प्रीतीचा वर्षाव केला. तो शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे.