
नागपूर, १३ डिसेंबर (वार्ता.) – राज्यातील आर्थिक अडचणीत असणार्या २६१ सहकारी उपसा जलसिंचन संस्थांच्या योजनांचे थकीत कर्ज मुद्दल अंदाजित १३२ कोटी ५४ लाख रुपये १४ ऑक्टोंबर २०२४ मंत्रिमंडळाच्या बैठकीत माफ करण्यास मान्यता देण्यात आली होती. दुसर्या दिवशी आचारसंहिता चालू झाल्याने तसे पत्र देता आले नाही. आतापर्यंत राज्य सरकार केवळ मुद्दल भरत होते, त्यावरील व्याज अधिकोष सहन करत होता. भारतीय रिझर्व्ह बँकेने ३१ डिसेंबर २०२४ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात कर्जमाफी देतांना मुद्दल आणि त्यावरील व्याजही द्यावे लागेल. असे सांगितले. आता मुद्दल आणि व्याज देण्यासाठी ४०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे त्याचा पुन्हा नव्याने प्रस्ताव सिद्ध करून तो मान्यतेसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवला आहे, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत दिली. याविषयी भाजपचे डॉ. परिणय फुले यांनी तारांकित प्रश्न विचारला.
हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे संशयास्पदरित्या फिरणारे ३ काश्मिरी मुसलमान पोलिसांच्या कह्यात
बांदोडा येथील जैन समाजाच्या वारसा स्थळी मोहरमनिमित्त उघड्यावर बकरा कापण्यास बंदी घाला
जनकल्याण आणि दुष्काळ टळण्यासाठी आचरा येथील ग्रामस्थांचा श्री देव ठाणेश्वराला जलाभिषेक !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
‘जीवोत्तम विद्यापीठम्’ सनातन धर्माच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी
स्मार्ट मीटरच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांचे आंदोलन