पुणे – तीर्थक्षेत्र आळंदीतील (पुणे) भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीला वाढत्या अस्वच्छतेने, जलप्रदूषणाने ग्रासले आहे. इंद्रायणी नदीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतून रसायन आणि मैलामिश्रित सांडपाणी थेट सोडले जात असल्याने नदीच्या पाण्यावर गेले २ दिवस फेस धरला आहे. यामुळे भाविक, नागरिक यांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे. (नदीच्या प्रदूषणाविषयी वांझोट्या चर्चा, परिषदा घेणारी पुरोगामी मंडळी आता झोपली आहेत का ? प्रशासन या प्रदूषणाविषयी पावले उचलत नसल्यामुळे दायित्व निश्चित करून अधिकार्यांवरही कारवाई होणे आवश्यक आहे ! प्रदूषणकारी कारखाने, व्यक्ती यांच्यावर कठोर कारवाई केल्याविना ही समस्या सुटणार नाही ! – संपादक)
पुन:पुन्हा फेसाळत आहे इंद्रायणी नदी !
नूतन लेख
- धुळे जिल्ह्यात गांजा शेतीवर धाड !
- जळगाव येथे ६ विद्यार्थी-विद्यार्थिनींचे ३ विद्यार्थिनींकडून रॅगिंग !
- महालक्ष्मी स्थानक आणि परिसर यांचा पुनर्विकास होणार !
- सहलीला गेलेल्या वसईतील पोलिसांकडून युवतीची छेडछाड आणि अपहरण करण्याचा प्रयत्न !
- दहावीतील विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणारे अटकेत !
- सांगली येथे २९ सप्टेंबरला विनामूल्य आरोग्य पडताळणी आणि रक्तदान शिबीर !