
कोल्हापूर – जिल्ह्यातील १ सहस्र १५ ग्रामपंचायतींना गेल्या आर्थिक वर्षातील १५ व्या वित्त आयोगातील निधीचा दुसरा हप्ता ४७ कोटी ७२ लाख १० सहस्र रुपये ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. या निधीतील स्वच्छता, स्थानिक स्वराज्य संस्थांची देखभाल-दुरुस्ती, पेयजल योजना, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर रिसायकलिंग यांसाठी ५० टक्के निधी वापरणे बंधनकारक आहे. यात करवीर तालुक्याला ८ कोटी १८ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. राज्यातील २६ जिल्हा परिषद, २८९ पंचायत समित्या आणि ६३५ ग्रामपंचायतींवर प्रशासक असल्याने या स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांचा वाटा यातून देण्यात आलेला नाही.
ऐरोली बसस्थानकात मोठ्या पावसानंतर खड्डे
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी