३०० आमदारांसह शहरी भागांतील सर्वसामान्यांनाही मिळणार हक्काची घरे !

मुख्यमंत्री ठाकरे यांची घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, २५ मार्च (वार्ता.) – ग्रामीण भागांतील जनतेला घरे देत आहोत. त्याचप्रमाणे शहरातील कष्टकर्‍यांनाही घर देणार असून सामान्यांच्या घरांसाठी सरकार कटिबद्ध आहे. योजना करायच्या म्हणून करायच्या नाहीत, तर त्या सरकारला कार्यवाहीत आणायच्या आहेत. झोपडपट्टीवासियांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होत आहे. ३०० आमदारांनाही घरे बांधून देणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी २४ मार्च या दिवशी विधानसभेत केली.