व्यापारी महासंघाचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना निवेदन
सांगली, ७ जुलै (वार्ता.) – अत्यावश्यक सेवा वगळता इतर २० टक्के व्यवसाय ७० पेक्षा अधिक दिवस प्रशासनाने बंद ठेवले आहेत. बंद कालावधीत या घटकांना शासनाने कोणतेही साहाय्य केलेले नाही. भारतीय संविधानामध्ये जगण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे स्वत:चे कुटुंब आणि कामगारांचे वेतन देण्यासाठी आता आमची दुकाने उघडण्याशिवाय काहीही पर्याय राहिलेला नाही.

त्यामुळे सर्व व्यावसायिक ८ जुलैपासून सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत त्यांची दुकाने चालू करणार आहेत याची नोंद घ्यावी, असे निवेदन व्यापारी महासंघाच्या वतीने सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी आणि सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांना ७ जुलै या दिवशी देण्यात आले. या वेळी व्यापारी महासंघाचे अतुल शहा, विराज कोकणे, राजेंद्र पवार, तसेच सुभाष सारडा,अश्वीन दावडा, शामसुंदर परिख, अभय गोगटे, ओंकार शिखरे आणि अन्य उपस्थित होते.

दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
घरपट्टीच्या नोटिसीतील जाचक अटी आणि कालमर्यादा रहित करावी ! – ‘व्यापारी एकता असोसिएशन’ची मागणी
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !
स्थानांतरासाठी शिक्षकाकडून २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अधिकारी डी.सी. कुंभार यांना अटक
अनधिकृत मशिदीच्या विरोधात लढणार्या कोष्टी कुटुंबाला धर्मांधांकडून जिवे मारण्याची धमकी !
अक्कलकोट येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करणार्या अरबाजला अटक !