
कोल्हापूर, २९ एप्रिल (वार्ता.) – अनेक दिवसांच्या उकाड्यानंतर त्रस्त झालेल्या कोल्हापुराकरांना २९ एप्रिल या दिवशी सायंकाळी ५ वाजता गारांच्या वर्षावाचा आनंद लुटला. कोरोनामुळे लागू असलेल्या दळणवळण बंदीमुळे घरीच असलेल्या बाळ-गोपाळांसह नागरिकांनी गारा खाल्या. गेले दोन-तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी गारांचा पाऊस पडत होता; मात्र शहराला तो हुलकावणी देत होता. अखेर २९ एप्रिल या दिवशी वादळी वार्यासह गारांच्या पावसाने कोल्हापूर चिंब भिजले. मोठ्या प्रमाणात पडलेल्या आणि मोठ्या आकाराच्या गारांमुळे काही काळ रस्तेही पांढरे शुभ्र झाले होते.
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
‘कोल्हापूर हायकर्स पवित्र जल संकलन मोहिमे’त विविध नद्या, गड यांवरील पाण्याचे संकलन !
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
रेल्वेमार्गाने येणार्या बांगलादेशी घुसखोरांचा बंदोबस्त करा ! – सकल हिंदु समाजाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !