
‘काही दिवसांपूर्वी एका परिचिताशी भेट झाली. त्यांनी म्हटले, ‘‘माझ्या कन्येचा विवाह सुनिश्चित झाला आहे. मुलगा सरकारी चाकरीत आहे आणि खात्यापित्या घराण्यातील असून चांगल्या संस्कारांचा आहे. त्या मुलाची सर्वांत चांगली गोष्ट ही आहे की, त्याची वरकमाईही (लाच घेऊन धन कमावणे) आहे.’’ मी म्हणाले, ‘‘पण वरकमाई करणे, तर पाप आहे.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘आजकाल तर सर्वजण तेच करतात. वरकमाई करणे, हे काही आता पापकर्म राहिले नाही.’’ यातूनच लक्षात येते की, सर्वसामान्य भारतियांना भ्रष्टाचार करणे आता पापकर्म वाटत नाही, तर वरकमाई करणार्या व्यक्तीला आता सुसंस्कारी म्हटले जाते. ज्या देशात सर्वसामान्य व्यक्तीची मानसिकता अशी झाली असेल, तर त्या देशाचे नाव भ्रष्टाचारी देशांच्या सूचीत (अग्रक्रमावर) आले, तर त्यात आश्चर्य ते काय ?’
(संदर्भ : मासिक ‘वैदिक उपासना’, ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१७)
Odisha Vigilance Arrests Engineer : ओडिशात अभियंत्याकडून कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
महिला रुग्णाकडून लाच घेतांना कामथे उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरला पकडले
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?