सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना सत्संगात साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. अन्य कोणत्याही वर्तमानपत्रात सकारात्मक ऊर्जा नसून ती केवळ दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आहे !

श्री. सूरज हरवळकर, बेळगाव : ‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या साधकांच्या अनुभूती वाचून माझी भावजागृती होते, तशी अन्य दैनिके वाचून होत नाही.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : दैनिक ‘सनातन प्रभात’ची ‘यु.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या यंत्राद्वारे सकारात्मक ऊर्जा मोजली आहे. केवळ दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सकारात्मक ऊर्जा आहे.

२. हिंदूंच्या भयावह स्थितीविषयी वाईट वाटण्यापेक्षा राग येऊन हिंदूंची स्थिती बदलण्यासाठी ‘आपण काहीतरी करूया’, असे वाटायला हवे !

श्री. सूरज हरवळकर : सध्या भारतात सर्वत्र हिंदु समाजावर आक्रमणे आणि अत्याचार होत आहेत. काही ठिकाणी दंगे होऊन हिंदू पलायन करत आहेत. जेव्हा मी हे वाचतो, तेव्हा मला हिंदूंच्या भयावह स्थितीविषयी फार वाईट वाटते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हिंदूंच्या भयावह स्थितीविषयी वाईट वाटण्यापेक्षा राग आला पाहिजे. ‘वाईट वाटले आणि रडत बसलो’, असे नको. ‘आता आपण हिंदूंची स्थिती बदलण्यासाठी काहीतरी करूया’, असे वाटले पाहिजे.

३. साधनेमध्ये भाव महत्त्वाचा !

श्री. सूरज हरवळकर : हो. मला काहीतरी करावेसे वाटते. गुरुदेव, ‘आपण प्रभु श्रीराम आहातच आणि आम्ही वानरसेना आहोत’, असे मला वाटते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले  : हा भाव महत्त्वाचा असतो. भाव असला की, देव आपल्या पाठीशी असतो. छान !’