
प्रश्न –
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : वाईट शक्ती मला ठार मारण्याऐवजी माझे बोलणे बंद करून कार्यात अडथळे आणत आहेत. त्या असे का करत आहेत ? असे करण्याऐवजी त्या मला ठार का करत नाहीत ?

उत्तर –
श्री. राम होनप :
१. वाईट शक्तींचे आसुरी कार्य
‘वाईट शक्ती ‘साधना करणार्या साधकांना त्रास देणे आणि त्यांच्या धर्मकार्यात अडथळे आणणे’, यांसाठी सूक्ष्मातून लक्षावधी वर्षांपासून प्रयत्नशील आहेत.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे धर्मकार्य
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी पृथ्वीवर सनातन धर्माची पुनर्स्थापना करण्याचे कार्य हाती घेतले. यासाठी त्यांनी सहस्रो जिवांमध्ये राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम जागृत केले, तसेच त्या जिवांच्या मनावर साधना अन् धर्माचरण यांचे महत्त्व बिंबवले. त्यामुळे त्या जिवांमधील सत्त्वगुण हळूहळू वाढू लागला.
३. वर्ष २००१ पासून वाईट शक्तींनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर जीवघेणी आक्रमणे करण्यास प्रारंभ करणे
त्यामुळे वाईट शक्ती सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांवर पुष्कळ चिडल्या. त्याचा परिणाम म्हणून वर्ष २००१ पासून वाईट शक्तींनी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांवर सूक्ष्मातून जीवघेणी आक्रमणे करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना ‘प्राणशक्ती अल्प होणे, पुष्कळ थकवा येणे, तोंडाला कोरड पडणे’, इत्यादी त्रास होऊ लागले. पहिल्या आणि दुसर्या पाताळांतील वाईट शक्तींना सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना ठार करणे अशक्य झाले. त्यामुळे त्यांच्या साहाय्याला अनुक्रमे पाताळ क्रमांक ३ ते ७ पर्यंतच्या वाईट शक्ती टप्प्याटप्प्याने आल्या.
४. वर्ष २०२२ पासून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे बोलणे बंद करण्यासाठी वाईट शक्तींनी सूक्ष्मातून त्यांच्या मुखावर आक्रमण करणे
वर्ष २०२२ मध्ये सप्तपाताळांतील वाईट शक्तींच्या लक्षात आले, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना ठार करणे अशक्य आहे.’ त्यामुळे त्यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या मुखावर सूक्ष्मातून आक्रमण करणे चालू केले. परिणामी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर बोलत असतांना त्यांच्या शब्दांचे उच्चार अस्पष्ट होऊ लागले. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे बोलणे बंद झाल्यास ‘समष्टीला मार्गदर्शन मिळणार नाही आणि सनातन धर्माच्या कार्याला खीळ बसेल’, या उद्देशाने वाईट शक्तींनी त्यांचे बोलणे बंद पाडण्यावर लक्ष केंद्रित केले.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१२.२०२५)
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
चैतन्य, आनंद आणि उत्साह देणारा मुंबई येथील श्री राजमातंगी महायज्ञ !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !