सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांचा आरोप

सावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार्या शक्तीपीठ महामार्गाचा नवीन आराखडा सिंधुदुर्ग जिल्ह्यावर अन्याय करणारा आहे. हा महामार्ग थेट गोवा राज्याला जोडतांना त्याचा एक उपमार्ग (फाटा) रेडी बंदराला जोडला जावा, अशी माझी मागणी आहे. या मागणीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे, अशी माहिती माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी दिली.
याविषयी केसरकर पुढे म्हणाले, ‘‘शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या आराखड्यानुसार या महामार्गावरून येणारे पर्यटक थेट गोवा राज्यात जाणार असतील, तर हा कोकणवर अन्याय आहे. कोकणात उत्कृष्ट असे समुद्रकिनारे आहेत, बंदरे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील माल गोव्याच्या बंदावरून आयात-निर्यात का व्हावा ?, हा प्रश्न आहे. हा मार्ग आजर्यावरून रेडी बंदराला जोडला गेला पाहिजे. हा रस्ता मुंबई-गोवा महामार्गाला छेदत (क्रॉस होत) असल्याने लोक पत्रादेवीला जाऊ शकतात, तसेच कोकणचा सागरी महामार्ग इथे जोडला जाणार आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून होणारा शक्तीपीठ महामार्ग केवळ चंदगडवरून गोव्याला जोडला जाऊ नये. चंदगडला दुर्लक्षित करावे, असे आपले म्हणणे नसून तिलारीमार्गे उत्तर गोव्याला अन् एक फाटा दक्षिण गोव्याला जोडला जाऊ शकतो. मोठ्या प्रमाणात पर्यटक चंदगड अन् दोडामार्ग तालुक्यांत वाढतील.’’
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !