राष्‍ट्रीय मानवी हक्‍क आयोगाकडून एस्.टी. कर्मचार्‍यांच्‍या तक्रारीची नोंद !

संपूर्ण महाराष्‍ट्रासह देशातील गुजरात, मध्‍यप्रदेश, कर्नाटक, गोवा, तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश या ७ राज्‍यांतील प्रवाशांचा प्रवास सुखकर करणारे राज्‍य परिवहन (एस्.टी.) महामंडळाचे कर्मचारी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.

दुरवस्‍था झालेल्‍या बसगाडीवर गतीमान शासनाचे विज्ञापन असलेले छायाचित्र समाजमाध्‍यमांतून प्रसारित

राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या भूम (जिल्‍हा धाराशिव) येथील आगारातील काचा नसलेल्‍या एका बसगाडीचे छायाचित्र सध्‍या मोठ्या प्रमाणात समाजमाध्‍यमांतून प्रसारित होत आहे. या बसगाडीत एक वृद्ध आणि लहान मुलगा खिडकीत बसले आहेत; मात्र खिडक्‍यांना काचाच नाहीत. तसेच बसचा पत्राही तुटला आहे.

२५ वर्षे विनाअपघात सेवा देणार्‍या सोलापूर जिल्‍ह्यातील ५६ चालकांचा परिवहन महामंडळाकडून गौरव !

अशा चालकांचा अन्‍य चालकांनी आदर्श घ्‍यावा. असे कर्तव्‍यदक्ष चालकच देशाची शक्‍ती आहे !

पंढरपूर येथील माघ वारीसाठी सोलापूर विभागातून १६० जादा गाड्यांचे नियोजन ! – विनोदकुमार भालेराव, विभाग नियंत्रक

माघ वारीच्‍या निमित्ताने १ कोटी ५८ लाख रुपये उत्‍पन्‍नाचे उद्दीष्‍ट ठेवण्‍यात आले आहे, अशी माहिती राज्‍य परिवहन महामंडळाचे सोलापूर जिल्‍ह्याचे विभाग नियंत्रक विनोदकुमार भालेराव यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ला दिली.

एस्.टी. महामंडळात ५ सहस्र ३०० नवीन वातानुकूलित इलेक्‍ट्रिक गाड्या येणार !

गाड्या वातानुकूलित असल्‍या, तरी गाड्यांच्‍या तिकिट दरामध्‍ये वाढ करण्‍यात येणार नाही. एस्.टी. महामंडळाचे उत्‍पन्‍न वाढावे, यासाठी विविध उपाययोजना राबवण्‍यात येत आहेत.

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नवीन ७०० बसगाड्या घेण्याची प्रक्रिया चालू ! – शंभूराज देसाई, मंत्री

अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी २८ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत तारांकित प्रश्नात दिली. सदस्य राजेश राठोड यांनी हा प्रश्न विचारला होता.

नागपूर ते शिर्डी शयनयान बस १५ डिसेंबरपासून चालू होणार !

मुंबई-नागपूरला जोडणार्‍या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या ५२० कि.मी.च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर या दिवशी झाले होते. त्यानंतर १५ डिसेंबरपासून नागपूर ते शिर्डी अशी ‘नॉन एसी शयनयान’ बससेवा चालू करण्यात येणार आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दत्त जयंतीनिमित्त अधिकच्या ५५ गाड्यांचे नियोजन !

राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने दत्तजयंतीच्या निमित्ताने भाविकांसाठी  अधिकच्या ५५ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात नृसिंहवाडी-सांगली, नृसिंहवाडी-हुपरी, नृसिंहवाडी-कोल्हापूर, इचलकरंजी यांचा समावेश आहे.

नागपूर येथील एस्.टी.तील पात्रता परीक्षेत अपव्यवहार प्रकरणी ३ अधिकारी निलंबित !

अपव्यवहार करणार्‍या दोषी अधिकार्‍यांना नुसते निलंबित केल्यास त्यांच्या वृत्तीत काहीच पालट होणार नाही ! त्यामुळे अशा अधिकार्‍यांवर बडतर्फीची कारवाई करून कायमचे घरी पाठवले पाहिजे.

सीमाप्रश्नामुळे महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांतील बससेवा विस्कळीत !

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाचा वाद चालू असल्याने नगरहून गाणगापूरकडे जाणारी १ बस कर्नाटकच्या सीमेवर थांबवण्यात आली होती. या बसमध्ये ४८ प्रवासी होते. त्यामुळे अनेक प्रवाशांना ताटकळत बसावे लागले.