व्यायाम एकट्याने करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन करावा !

व्यायामामध्ये खंड पडू नये, यासाठी घरातील सर्वांनी सर्वांच्या सोयीनुसार एखादी वेळ ठरवून एकत्र येऊन व्यायाम करावा. असे केल्याने व्यायामात सातत्य टिकून रहाते.

दातांच्या मुळांशी जमा झालेला मळ जात नसल्यास एकदा दंतवैद्यांकडे जाऊन दात स्वच्छ करून घ्यावेत !

दात निरोगी रहाण्यासाठी दातांच्या मुळांशी असलेला हा मळ काढावा लागतो; परंतु दात ब्रशने घासून हा मळ निघत नाही. त्यामुळे एकदा दंतवैद्यांकडे जाऊन आपले दात तपासून घ्यावेत आणि त्यांच्या सल्ल्यानुसार दात स्वच्छ करून घ्यावेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले नियमित व्यायाम करण्याचे महत्त्व !

व्यायाम केला नाही, तर शरीर चांगले ठेवण्यासाठी तुमची साधना व्यय होते.साधनेच्या दृष्टीने शरीर चांगले रहावे; म्हणून नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.

तापामध्ये गुणकारी ‘सनातन त्रिभुवनकीर्ती रस (गोळ्या)’ आणि ‘सनातन मुस्ता (नागरमोथा) चूर्ण’

सर्व प्रकारच्या तापांवर हा आयुर्वेदाचा प्राथमिक उपचार आहे. याप्रमाणे केल्यास ताप हटकून बरा होतो; परंतु तरीही ३ दिवसांत गुण न आल्यास स्थानिक वैद्यांकडून उपचार घ्यावेत.

सतत बसून न रहाता मध्‍ये मध्‍ये उठून उभे रहाणे आवश्‍यक !

‘प्रत्‍येक २० मिनिटांनी न्‍यूनतम २० सेकंद उठून उभे रहावे आणि पुन्‍हा बसावे. यासाठी गजर लावावा. जे सतत उभे राहून काम करतात, त्‍यांनी प्रत्‍येक २० मिनिटांनी न्‍यूनतम २० सेकंद बसावे आणि पुन्‍हा उभे रहावे.’

सातत्‍याने संगणकीय काम करणार्‍यांसाठी ‘२०-२०-२० चा नियम’ !

‘२०-२०-२० चा नियम’ ! ‘केवळ एवढे केल्‍याने डोळ्‍यांवरील ताण लक्षणीय रितीने न्‍यून झाला’, असे संशोधनामध्‍ये आढळले. कृती लहानशी वाटली, तरी पुष्‍कळ परिणामकारक असल्‍याने सर्वांनीच आचरणात आणावी.’

संभाजीनगर येथे हिंदु जनजागृती समिती आणि इंडियन सोसायटी ऑफ अ‍ॅनास्‍थिसीओलॉजिस्‍टिक्‍स यांच्‍या वतीने ‘सी.पी.आर्.’चे प्रशिक्षण पार पडले !

गंभीर रुग्‍णांना ओळखून त्‍यांच्‍यावर प्रथमोपचार केले पाहिजेत. यासाठी आवश्‍यक असे ‘सी.पी.आर्.’ प्रशिक्षण सर्वांनी शिकणे आवश्‍यक आहे.

जेवण न जाणे, पोट साफ न होणे यांसारख्या तक्रारींवर ‘सनातन आमलकी (आवळा) चूर्णा’चा आगळा प्रयोग

‘जेवण न जाणे, पोट साफ न होणे, वारंवार पित्त होणे यांसारख्या तक्रारी असतील, तर ‘सनातन आमलकी चूर्ण’, चवीपुरते मीठ आणि हे भिजेल एवढे १ – २ चमचे ताक किंवा पाणी एकत्र नीट मिसळून चटणी बनवावी. ही चटणी जेवणात मधे मधे खावी.

सर्दी, खोकला आणि ताप यांमध्‍ये तुळशीचा उपयोग

‘सर्दी, खोकला आणि ताप यांवर तुळस हे रामबाण औषध आहे. हे विकार झाले असतांना तुळशीची २-२ पाने दिवसातून ३ वेळा चावून खावीत. तुळशीची १०-१५ पाने १ पेला पाण्‍यात उकळून वाफारा घ्‍यावा. दिवसातून २ वेळा १-१ कप तुळशीचा काढा (वाफारा घेऊन झाल्‍यावर शिल्लक रहाणारे पाणी) प्‍यावा. असे ३ ते ५ दिवस करावे.

वैद्यांनी सखोल आयुर्वेदाध्‍ययन करून ‘सुपरस्‍पेशालिटी’ (विशेष तज्ञ) वैद्य बनणे, ही काळाची आवश्‍यकता !

प्रत्‍येक वैद्याने कोणत्‍याही एका आवडीच्‍या विषयाची किंवा रोगाची निवड करावी आणि त्‍या संदर्भात सखोल आयुर्वेदाचे अध्‍ययन करावे. त्‍या विषयातील ‘सुपरस्‍पेशालिस्‍ट’कडे जाऊन काही काळ अनुभव संपादन करावा आणि मग स्‍वतः आत्‍मविश्‍वासाने आयुर्वेदानुसार त्‍या रोगाची चिकित्‍सा करावी.