ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे अनमोल विचारधन
‘दुःख करणे किंवा न करणे हा मनाचा धर्म असल्यामुळे ज्या माणसाने मनाला योग्य वळण दिले आहे, तो माणूस प्रत्यक्ष दुःख भोगत असतांनाही आनंदात राहू शकेल.
‘दुःख करणे किंवा न करणे हा मनाचा धर्म असल्यामुळे ज्या माणसाने मनाला योग्य वळण दिले आहे, तो माणूस प्रत्यक्ष दुःख भोगत असतांनाही आनंदात राहू शकेल.
‘भक्त प्रारब्ध टाळू शकतो; पण तो देहाला विसरला असल्याकारणाने देहाचे भोग भोगणे आणि न भोगणे या दोन्हींची त्याला काळजी नसते; म्हणून तो भोग टाळत नाही.’
लागोनियां पायां विनवितो तुम्हांला ।
करे टाळी बोला मुखे नाम ॥
देवतांची उपासना करतांना त्यांच्या प्रचलित सगुण रूपाची उपासना करावी. त्या वेळी संबंधित देवता जवळची वाटते अन् त्यातून भावजागृतीही लगेच होते.
ईश्वर सर्वज्ञानी आहे. आपल्याला त्याच्याशी एकरूप व्हायचे असल्यामुळे आपण सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणे आवश्यक असते.
शिष्याच्या उद्धारासाठी गुरु शिष्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार गुरुमंत्र म्हणून एखाद्या देवतेचा नामजप करण्यास सांगतात.
हे दत्तात्रेया, तू जसे २४ गुणगुरु केलेस, तसे सर्वांमधील चांगले गुण घेण्याची वृत्ती माझ्यातही निर्माण होऊ दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना !
आत्मानंदाकडे घेऊन जाणारा ॐकार ज्याच्याविषयी बोलतो, जो जगाच्या उत्पत्ती-स्थिति-लय या चक्रांतून सुटका करून घेण्यासाठी भक्तांच्या बुद्धीला प्रेरक आहे. तोच एकमात्र देव, भक्तांचा सत्च्चिदानंद सुखाशी एकी घडवणारा दत्त आहे.
दत्ताच्या नामजपातून निर्माण होणार्या शक्तीने नामजप करणार्याच्या भोवती संरक्षककवच निर्माण होते. बहुतेक जण साधना करत नसल्यामुळे ते मायेत सर्वाधिक गुरफटलेले असतात. यामुळे मृत्यूनंतर अशांचा लिंगदेह अतृप्त रहातो.
‘मन चांगले आणि शुद्ध असल्यावर सर्व करता येते. मन निर्मळ झाल्यावर आपोआपच आपली फलनिष्पत्ती वाढते. मनाच्या निर्मळतेमुळे कोणतेही कर्म करतांना आनंद मिळतो आणि मनुष्य ताणमुक्त होऊन लवकर ईश्वरापर्यंत पोचतो.