ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे अनमोल विचारधन

‘दुःख करणे किंवा न करणे हा मनाचा धर्म असल्यामुळे ज्या माणसाने मनाला योग्य वळण दिले आहे, तो माणूस प्रत्यक्ष दुःख भोगत असतांनाही आनंदात राहू शकेल.

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची अमृतवाणी

‘भक्त प्रारब्ध टाळू शकतो; पण तो देहाला विसरला असल्याकारणाने देहाचे भोग भोगणे आणि न भोगणे या दोन्हींची त्याला काळजी नसते; म्हणून तो भोग टाळत नाही.’

टाळ्या वाजवण्याचा खरा उपयोग कुणाचे कौतुक म्हणून नव्हे, तर भजने म्हणण्यासाठी करा !

लागोनियां पायां विनवितो तुम्हांला ।
करे टाळी बोला मुखे नाम ॥

देवतेच्या व्यापक रूपाची उपासना कठीण असल्यामुळे तिच्या प्रचलित रूपाचीच उपासना करावी ! 

देवतांची उपासना करतांना त्यांच्या प्रचलित सगुण रूपाची उपासना करावी. त्या वेळी संबंधित देवता जवळची वाटते अन् त्यातून भावजागृतीही लगेच होते.

शिकवण्यापेक्षा शिकण्याची वृत्ती ठेवली, तर अधिक लाभ होणे

ईश्वर सर्वज्ञानी आहे. आपल्याला त्याच्याशी एकरूप व्हायचे असल्यामुळे आपण सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणे आवश्यक असते.

गुरुमंत्राचे महत्त्व लक्षात न घेता गुरूंच्या देहाच्या नावात अडकणारे शिष्य !

शिष्याच्या उद्धारासाठी गुरु शिष्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार गुरुमंत्र म्हणून एखाद्या देवतेचा नामजप करण्यास सांगतात.

दत्ताला करावयाच्या प्रार्थना !

हे दत्तात्रेया, तू जसे २४ गुणगुरु केलेस, तसे सर्वांमधील चांगले गुण घेण्याची वृत्ती माझ्यातही निर्माण होऊ दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना !

ॐकार ज्याचा वाचक । जगध्देतू धीप्रेरक । तोचि देव सच्चित्सुख । एक दत्त ।।

आत्मानंदाकडे घेऊन जाणारा ॐकार ज्याच्याविषयी बोलतो, जो जगाच्या उत्पत्ती-स्थिति-लय या चक्रांतून सुटका करून घेण्यासाठी भक्तांच्या बुद्धीला प्रेरक आहे. तोच एकमात्र देव, भक्तांचा सत्च्चिदानंद सुखाशी एकी घडवणारा दत्त आहे.

दत्ताच्या नामाने अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण कसे होते ?

दत्ताच्या नामजपातून निर्माण होणार्‍या शक्तीने नामजप करणार्‍याच्या भोवती संरक्षककवच निर्माण होते. बहुतेक जण साधना करत नसल्यामुळे ते मायेत सर्वाधिक गुरफटलेले असतात. यामुळे मृत्यूनंतर अशांचा लिंगदेह अतृप्त रहातो.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने !

‘मन चांगले आणि शुद्ध असल्यावर सर्व करता येते. मन निर्मळ झाल्यावर आपोआपच आपली फलनिष्पत्ती वाढते. मनाच्या निर्मळतेमुळे कोणतेही कर्म करतांना आनंद मिळतो आणि मनुष्य ताणमुक्त होऊन लवकर ईश्वरापर्यंत पोचतो.