४ लाख १ सहस्र ३७४ रुपये किंमतीचे साहित्य जप्त

ठाणे, ९ सप्टेंबर (वार्ता.) – जिल्ह्यातील दूध भेसळ थांबवण्यासाठी जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून जिल्हा अन्न आणि औषध प्रशासन विभागाने वागळे इस्टेट भागातील मे. केवला डेअरी अन् मे. यादव मिल्क प्रोडक्ट या ठिकाणी अचानक पडताळणी केली. त्या वेळी अस्वच्छ वातावरणात पनीर उत्पादन करत असल्याचे आढळून आले. (अस्वच्छ वातावरणात पनीरचे उत्पादन करून लोकांच्या जिवाशी खेळणार्यांवर कठोर कारवाई करायला हवी ! – संपादक) या कारवाईत सुमारे ४ लाख १ सहस्र ३७४ रुपये किंमतीचे पनीर, दूध आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. पनीरचे नमुने पडताळणीसाठी पाठवण्यात आले असून पुढील अन्वेषण चालू आहे.
म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रातून रशियाचा नागरिक पसार
आरोंदा येथे अवैधरित्या वास्तव्य करणार्या रशियाच्या नागरिकाला कारावास
देशातील तुष्टीकरणाचे राजकारण संपून हिंदु अस्मितेचा नवा उदय झाला आहे ! – पालकमंत्री नितेश राणे
उच्च न्यायालयाने हानीभरपाई निश्चित करण्यासाठी मृतांची सविस्तर माहिती मागवली
मुरुड बसस्थानक आगारातील समस्यांविषयी जनआक्रोश बैठकीचे आयोजन !
वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देण्याचे आमीष दाखवून विद्यार्थी आणि पालक यांची फसवणूक !