
मुंबई, १० मार्च (वार्ता.) – राज्यात प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून वर्ष २०१७ मध्ये करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांवरील वस्तू अन् सेवा करातील २८ कोटी ३६ लाख रुपये ठेकेदाराच्या खिशात गेले आहेत. ही रक्कम सरकार कधीपर्यंत वसूल करणार ? असा तारांकित प्रश्न भाजपचे आमदार सुनील राणे यांनी विधानसभेत उपस्थित केला.
वर्ष २०१७ मध्ये राज्यात झालेल्या रस्त्यांच्या कामांवरील वस्तू आणि सेवा कराची ही रक्कम ५ वर्षांनंतरही ठेकेदाराकडून वसूल करण्यात आलेली नाही.
यावर उत्तर देतांना ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन म्हणाले, ‘‘राज्यातील २९ जिल्ह्यांतील १ सहस्र २४३ कामांवरील वस्तू आणि सेवा कराचे ठेकेदाराला अधिक देण्यात आले. राज्याच्या महाधिवक्त्यांनी हे सरकारच्या लक्षात आणून दिले. केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर लागू केला, तेव्हा राज्यात ही कामे चालू होती. त्या वेळी आधीच्या करप्रणालीनुसार करआकारणी करतांना ठेकेदाराला अधिक रक्कम देण्यात आली. कामांची माहिती घेऊन ठेकेदारांकडून हा पैसा वसूल करण्यात येईल.’’
नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ त्वरित रहित करावा – अधिवक्ता श्री. विश्वास पानसे, प्रमुख विश्वस्त, मार्तंड देवस्थान, जेजुरी
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन